मनसेचा धोका कोणाला?
Wednesday, January 31, 2007
स्थापना झाल्यापासून अवघ्या नऊ महिन्यांतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. पक्ष नवा असला, तरी राज ठाकरे लोकांच्या मनातीलच भावना बोलत असल्याने या पक्षापासून सर्वच पक्षांना सावध राहावे लागेल, अशी चिन्हे आहेत...

महापालिका निवडणुकीच्या मतदानाला नऊ दिवस शिल्लक आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांना ओरबाडे काढत परस्परांच्या विरोधात लढत आहे. शिवसेना-भारतीय जनता पक्ष युती असली तरी अनेक वॉर्डांत आपल्या वाट्याला जागा मिळाली नाही म्हणून अंतर्गत धूसफूस आहे. चिल्ल्यापिल्ल्या पक्षांनी तिसरी आघाडी पोखरून गेली आहे. राज ठाकरे यांनी स्थापन केलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा नऊ महिन्यांचा नवा पक्ष प्रथमच निवडणुकीला सामोरे जात आहे.

राज्यातील सर्व ११ महापालिकांमध्ये मनसेने रिंगणात उडी घेतली आहे. मुंबईतील २२७पैकी २२५ वार्डांत मनसेचे उमेदवार उभे आहेत. मनसेचे ठाण्यात ७९, पुण्यात १२०, पिंपरी-चिंचवडमधे ५२, नाशिकमधे १०५, अकोल्यात ४०, सोलापूरमधे २६ उमेदवार उभे आहेत. नागपूर व अन्यत्र ५० टक्के जागा मनसे लढवत आहे. मुंबईत मनसेने कोठेही कुणाबरोबर समझोता केेलेला नाही. जास्तीत जास्त जागा लढवल्यामुळे मनसेची ताकद कुठे कमी- जास्त आहे हे समजू शकेल आणि त्या आधारावर राज यांना संघटना बांधणीचा पुढील कार्यक्रम आखता येईल. अर्धा डझन वॉर्ड वगळता बहुतेक ठिकाणी मनसेच्या उमेदवारांना मुंबईत रेल्वे इंजिन हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. मुलंुडसारख्या ठिकाणी मनसेला कपबशी; तर कुर्ल्याला दोन ठिकाणी कोरी पाटी हे चिन्ह मिळाले आहे. १९६६ साली स्थापन झालेल्या शिवसेनेने पहिली निवडणूक लढवली होती, तेव्हाही सेनेला वेगवेगळ्या वॉर्डांतून वेगवेगळी निवडणूक चिन्हे मिळाली होती. राजकीय पक्ष म्हणून निवडणूक आयोगाची मान्यता मिळविण्यासाठी किमान सहा टक्के मते मिळायला हवीत. राज ठाकरे यांनाही मनसेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी महापालिका निवडणुकीत सहा टक्के मते प्राप्त करावी लागतील. त्यानंतरच मनसेला कायम स्वरूपी निवडणूक चिन्ह मिळू शकेल. येत्या निवडणुकीत पक्षाला जास्तीत जास्त मते मिळवून मुंबईसह प्रत्येक महापालिकेत प्रवेश करणे व अन्य पक्षांना दखल घ्यावी अशा संख्येने उमेदवार निवडून आणणे हे मनसेपुढील सर्वात मोठे आव्हान आहे. मनसे हा राजकारणातील कोरा चेक आहे, त्यामुळे जिंकणारी प्रत्येक जागा हा मनसेचा बोनस ठरणार आहे.

शिवसेनेचा जन्म १९६६मध्ये झाला. शिवसेना कशी वाढली, महापालिकेत व राज्यात सत्तेवर कशी आली हा तर ताजा इतिहास आहे. १९९९मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली; पण हा पक्ष स्थापन करणारे शरद पवारांसह सर्वच दिग्गज नेते अनुभवी होते. सेनेच्या स्थापनेनंतर ४० वर्षांनी खऱ्या अर्थाने नवा पक्ष स्थापन होताना आणि नऊ महिन्यांतच निवडणुकीला सामोरे जाताना बघायला मिळत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली, तेव्हा ते ४० वर्षांचे होते. मनसेची स्थापना करणारे राज ३८ वर्षांचे आहेत. मुंबईच्या चाळीचाळीतून आणि नाक्यानाक्यांवर पायपीट करून बाळासाहेबांनी शिवसेनेची बांधणी केली. आज राजही पायाला भिंगरी लावल्यासारखे मुंबई आणि राज्यात सर्वत्र फिरत आहेत. वडील काँग्रेसमध्ये आणि मुले शिवसेनेत अशी काही काळ परिस्थिती होती. आता वडील शिवसेनेत आणि मुले मनसेत असे दृश्य दिसू लागले आहे. मनसैनिक हा गल्लीबोळात दिसला पाहिजे, सार्वजनिक कामात आघाडीवर असला पाहिजे, यासाठी राज आग्रही आहेत.

राज यांच्याविषयी तरुणवर्गाला मोठे आकर्षण आहे. सर्वाधिक गदीर् खेचणारा महाराष्ट्रातील नेता अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. महिलांची उपस्थितीही लक्षणीय असते. ज्यांचा राजकारणाशी कधीही संबंध आलेला नाही, असे अनेक लोक राज यांच्या सभांना उपस्थित असल्याचे दिसतात. राज हे पुढारी किंवा नेत्यांच्या थाटात वागत नाहीत. मग्रुरी किंवा मस्ती त्यांच्या वागण्याबोलण्यात नाही. नीटनेटक्या कपड्यातले राज आपल्या मनातल्या वेदना बोलतात, असे जाणवते. शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्यावर शिवसेनेच्या मुखपत्रातून अनेकदा धारदार प्रहार केले. मुलाखतीतूनही सडकून टीका केली. पण राज यांनी कमालीचा संयम बाळगला आहे. बाळासाहेब मुलाखतीतून जे बोलले, तो त्यांचा अधिकार आहे, मी त्यांना कदापि प्रत्युत्तर देणार नाही. परंतु बाळासाहेबांच्या आडून कोणी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी याद राखा, माझ्याही तोंडाचा पट्टा सुटेल, अशा शब्दात राज यांनी इशारा दिला आहे. आपल्या भाषणातून ते कोणाचा अवमान होईल असे वक्तव्य करीत नाहीत. कोणावर वैयक्तिक टीका करीत नाहीत. भावनिक मुद्याच्या आहारी जात नाहीत. मुंबईच्या विकासाचे स्वप्न ते मांडतात. राजकीय इच्छाशक्ती असेल तरच मुंबईचा विकास होईल असे ते सांगतात. आपल्याकडे तुम्हाला देण्यासाठी एकच गोष्ट आहे; ती म्हणजे इच्छाशक्ती असे सांगून ते लोकांची मने जिंकतात. सारखे रस्ते खोदायचे आणि पैसे काढायचे हे उद्योग बंद करण्यासाठी मनसेला निवडून द्या असे सांगतात. कंत्राटदार आणि नगरसेवकांचे रॅकेट आपल्याला मोडून काढायचे आहे, असे ठामपणे सांगतात. कचरामुक्त रस्ते व अतिक्रमणमुक्त फुटपाथ हवेत. एवढी अपेक्षाही करदात्या नागरिकाने या शहरात करायची नाही का, असा प्रश्न विचारून ते लोकांच्या मनाला साद घालतात.

कोणाच्या कानफटात मारून मराठीचा उत्त्कर्ष होणार नाही, कोणाचा द्वेष करून मराठी अस्मिता टिकणार नाही, हे राज ठणकावून सांगतात. बिन चेहऱ्याच्या माणसांना घेऊन राज निवडणुकीला सामोरे जात आहेत. प्रामाणिकपणा आणि संयम हीच त्यांची जमेची बाजू आहे. शिवसेना आणि काँग्रेस दोन्ही पक्षांना सावध राहावे लागेल अशी परिस्थिती मनसेने निर्माण केली आहे.
 
posted by Rohit at 9:10 AM | Permalink | 1 comments
'सायलेंट व्होटर'च महत्त्वाचा-राज ठाकरे
जी मंडळी एरवी मतदानासाठी बाहेर पडत नाहीत, ती माझ्या सभांना येत आहेत...

तुम्ही मुंबई-ठाण्यात सर्व जागांवर उमेदवार का उभे केले? इतके उमेदवार निवडून येतील असं तुम्हाला वाटतं?

ु राज ठाकरे : पक्षाच्या स्थापनेला एक वर्षही पूर्ण झालेलं नाही आणि या निवडणुका आल्या. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या चार शहरांवर आम्ही लक्ष केंदित केलं आहे. सर्व जागांवर आम्ही विजयी होऊ, असा दावा आम्हीच काय, कोणताच पक्ष करू शकणार नाही. तसा करणं हास्यास्पद असतं. पण या शहरांच्या विविध भागांमध्ये आमची नेमकी ताकद किती आहे, हे तरी कळेल. त्या आधारे भविष्यात पक्षबांधणीही करता येईल.

. कोणत्याही पक्षाशी युती केली नाहीत, यामागचं कारण काय?

ु कोणाशी करणार युती वा आघाडी? सर्वच पक्षांमध्ये उमेदवारीसाठी मारामाऱ्या चालल्या असताना त्यात न पडण्याचं आम्ही ठरवलं. शिवाय युतीमध्ये पक्षाची ताकद किती हे कळतच नाही.

. तुमचे जवळपास सर्व उमेदवार मराठी आहेत. शिवसेनेचेही मराठीच उमेदवार. ते एकमेकांची मतं खातील आणि अमराठी उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येतील, अशी चर्चा सुरू आहे..?

ु हा विचार शिवसेनेच्या नेत्यांनी मी त्या संघटनेत असताना करायला हवा होता. तेव्हा तो झाला असता, तर अशी भीती त्यांना राहिली नसती. शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचेही बहुसंख्य उमेदवार मराठीच आहेत.

. मुंबई महापालिकेत कोणत्याच पक्षाला बहुमत नसेल आणि तुमच्या पक्षाला सहा ते आठ जागा मिळतील, असा पोलिसांचा अंदाज आहे...

ु मी असल्या अंदाजांचा विचार करत नाही. एक तर त्यांनी कशाच्या आधारे निष्कर्ष काढले, हे माहीत नाही. शिवाय एक महिन्यापूवीर् केलेल्या पाहणीच्या आधारे हे निष्कर्ष काढले असतील, तर ते आता अर्थहीन आहेत. आम्हाला किती जागा मिळतील, हे तेच काय मीही सांगू शकत नाही आणि मी अंदाज बांधतही नाही. २ फेब्रुवारीला जे निकाल येतील, ते खरे. मुंबईतील २२७ पैकी १४५ जागांवर आम्ही लक्ष केंदित केलं आहे, एवढं मात्र मी आता सांगू शकतो. शिवाय दहाही महापालिकांत मनसेचे प्रतिनिधी पाहायला मिळतील, हे नक्की.

. पण तुम्हाला आठ ते दहा जागा मिळाल्या आणि मदतीसाठी एखादी युती वा आघाडी तुमच्याकडे आल्यास तुम्ही काय कराल?

ु हा जर तरचा प्रश्न झाला.

. पण शिवसेना-भाजपला पाठिंबा?

ु नाही. त्या युतीला पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

. निवडणुकांचं वातावरण का नाही?

ु लोक सर्व पक्षांना कंटाळले आहेत. त्या पक्षांनी काही केलंच नाही. मुंबईचे प्रश्न पडूनच आहेत. म्हणून ते गप्प आहेत. पण असा सायलेंट व्होटरच चमत्कार करून दाखवणार आहे. त्याचा फायदा आम्हाला होईल. मी लोकांना नवा नसलो, तरी माझा पक्ष नवखा आहे. हा पक्ष सांगतो, ते करून दाखवेल, असं वाटत असल्यामुळेच मनसेच्या आणि माझ्या सर्व सभांना प्रचंड गदीर् होत आहे. जी मंडळी एरवी मतदानासाठी बाहेर पडत नाहीत,ती माझ्या सभांना येत आहेत. सुशिक्षित, मध्यमवगीर्य, तरुण असेच सर्वच सभांना येत आहेत. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे.

. तुमच्या नगरसेवकांचे आधीच राजीनामे घेऊन ठेवण्याचं तुम्ही जाहीर केलं आहे. लोकशाहीमध्ये ही कृती कितपत योग्य आहे?

ु हो मी मनसेच्या नगरसेवकांचे राजीनामे घेऊन ठेवणारच. माझ्या नगरसेवकांनी पक्षशिस्त पाळायलाच हवी. लोकांची कामं करायलाच हवीत. ते त्यांनी केलं नाही, तर पक्ष बदनाम होईल. ते मला मान्य नाही. शिवाय माझ्या नावावर ते निवडून येणार आहेत. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याचा मला अधिकार आहे. लोकशाही म्हणजे काही बेबंदशाही नव्हे.

. तुमचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचं कधी बोलणं होतं का?

ु हो. आम्ही फोनवर अधूनमधून बोलत असतो. कधी मी त्यांना चांगला विनोद ऐकवतो, कधी ते ऐकवतात. कधी त्यांच्या तब्येतीच्या गप्पा होतात.

. उद्धवशी?

ु नाही. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर एकदाही नाही.

. तुम्ही शिवसेनेतून बाहेर पडलात. पण सेनच्या नेत्याशी तुमची बिझनेस पार्टनरशिप आहे..?

ु माझी बिझनेस पार्टनरशिप उन्मेष जोशीशी आहे आणि तो कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही. आपण बिझनेस पाहत नाही, असं मनोहर जोशी यांनीच जाहीर केलं आहे. शिवाय शिवसेना सोडली म्हणून बिझनेस पार्टनरशिप सोडण्याचं काय कारण?

. तुमच्या पक्षात वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोक आहेत. त्यांचा निवडणुकीच्या राजकारणात कितपत उपयोग होतोय?

ु अहो, अतुल परचुरे, भरत जाधव सभा घेत आहेत. त्यांच्या सभांनाही गदीर् होतय. वीणा पाटील यांचीही भाषणं चांगली झाली. राघव नरसाळेसारखा अर्थतज्ज्ञही सभांमध्ये भाषण करतोय. अर्थात ते राजकारणाच्या प्रोसेसमध्ये आहेत. त्यांनी कधीच अशी भाषणं केली नाहीत. ती थोडीशी शाय आहेत. पण होतील तयार. तेच काय, मीही 'मीडिया शाय' आहे. बाकीचे राजकारणी मीडियाशी जसं वागतात, तसं मला जमत नाही.

. प्रत्यक्षात तुम्ही अॅरोगंट आहात, असं अनेकांना वाटतं..?

ु तसं असतं, तर इतके लोक माझ्या मागे आले असते का? हा आरोप २० वर्षांपूवीर् केला असता, तर समजू शकलं असतं. तेव्हा मी खूपच लहान होतो. तेव्हाचं माझं वागणं तसं असू शकेल. पण आता मला नाही वाटत की मी अॅरोगंट आहे.
 
posted by Rohit at 8:24 AM | Permalink | 0 comments
राज यांचा 'शद्ब' इतरांसारखा नि वेगळा...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जाहीरनाम्याऐवजी राज ठाकरे यांनी प्रसृत केलेल्या 'माझा शद्ब' मध्ये अन्य पक्षांसारखेच अनेक मुद्दे आहेत; मात्र, वेगळेपणा दाखवून देणारीही काही आश्वासने यात आहेत.
जलवाहिन्यांच्या भोवती असलेल्या अनधिकृत झोपड्या काढणे, उपनगरांत पाच ट्रॉमाकेअर सेन्टर्स, महिलांसाठीची खास प्राथमिक आरोग्य केंद, पुढील ५० वर्षांचा विचार करून मलनिस्सारण आणि पर्जन्यवाहिन्यांचे नियोजन, पालिकेच्या दहा शाळा आणि शंभर खेळाडू दत्तक घेणे, मालमत्ता करासाठी रेडी रेकनर हा पाया धरून पुढच्या दहा वर्षांत प्रॉपटीर् टॅक्स वाढणार नाही आणि दर सहा महिन्यांनी पालिकेतील पैशाचा ताळेबंद लोकांना सादर करणे, असे थोडे हटके मुद्दे 'माझा शब्द' मध्ये आहेत.

स्मशानात गेल्यावर पुढची व्यवस्था मोफत करण्यापेक्षा स्मशानात जाण्याची कमीत कमी वेळ यावी, यासाठी आपला जाहीरनामा असल्याचा दावा त्यांनी केला. तरीही जाहीरनाम्यात पाणीपुरवठा प्रकल्प पूर्ण करणे, डास निर्मूलन मोहीम, राणीच्या बागेला आंतरराष्ट्रीय दर्जा, आपत्कालीन व्यवस्थांचे आधुनिकीकरण, कचरामुक्त मुंबई, झोपडपट्ट्यांत शौचालये, भूखंडांचे आरक्षण कायम ठेवणे, कारभाराचे संगणकीकरण, गावठाणांचा विकास अशी अन्य पक्षांनी दिलेली अनेक आश्वासने यातही आहेत.

...................................................................................................................

प्रॉपटीर् टॅक्स न वाढवण्याची हमी

नागरिकांना जमाखर्च दाखवणार

५० वर्षांचे पाणी-ड्रेनेज नियोजन
 
posted by Rohit at 8:19 AM | Permalink | 0 comments
महाराष्ट्र 'नऊ'निर्माण सेना?
राज ठाकरे यांचे नऊ आकड्यावरचे प्रेम पक्ष स्थापनेपासूनच लपून राहिलेले नाही. आताही महापालिका निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यापासून राज यांनी नऊचा एकही मुहूर्त वाया जाऊ दिला नाही. जाहीरनाम्याचे प्रकाशनही नऊचा मुहूर्त साधूनच झाले. ९ आणि ज्यांची बेरीज ९ येते अशा १८ आणि २७ या तारखा संख्याशास्त्राच्या दृष्टीने ९च. त्यामुळे निवडणूक घोषित झाल्यानंतर डिसेंबर आणि जानेवारीच्या अशा ९ च्या पाचही दिवशी राज यांनी प्रचाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टी केल्या आहेत.

शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिल्याचा वाढदिवस त्यांनी १८ डिसेंबरला साजरा केला तो सेनेच्या बालेकिल्ल्यात म्हणजे चिंचपोकळीत झालेल्या सभेने. राज यांच्या लाडक्या नाशकात प्रचाराचा नारळ फोडला तो २७ डिसेंबरच्या गोल्फ क्लब येथील भव्य सभेने. एवढेच नाही तर मुंबईतला प्रचाराचा नारळही गोरेगाव येथील एनएससी मैदानात दमदार मेळावा घेऊन नऊ जानेवारीच्या मुहुर्तावर. २७ जानेवारीला जाहीरनाम्याचे प्रकाशन झाले. १८ जानेवारी त्यांनी आतापर्यंतच्या घटनांच्या तुलनेत कमी महत्त्वाचा पण तरीही विदर्भातील सर्वाधिक महत्त्वाचा नागपुरचा मेळावा केला.

नवाचे हे प्रेम फक्त तारखांपुरते मर्यादित नाही. २२७ मतदारसंघ असूनही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २२५ उमेदवारी अर्ज भरले. एका ठिकाणी पैशाचे व्यवहार झाल्याने आणि दुसरीकडे जातीचे प्रमाणपत्र न मिळाल्याने दोन वॉर्डात अर्ज भरण्यात आले नाहीत. २२५ मधील आकड्यांची बेरीज ९ होते. शिवाय नऊची हवा राज यांच्या पाठीराख्यांमध्येही पसरली आहे. २००७ च्या अंकांची बेरीज ९ येते, त्यामुळे यावषीर् आपण चांगली कामगिरी करणार असा त्यांना भरवसा वाटतो आहे.
 
posted by Rohit at 8:09 AM | Permalink | 0 comments
शिवसेनेचे उमेदवार कर्माने पडतील- शिशिर शिंदे ,उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना
तुमचे उमेदवार नवखे, अननुभवी आहेत. कुणालाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेय...

राजीव गांधी राजकारणात आले तेव्हा तेही नवखेच होते. पण राजकारणात त्यांनी ठसा उमटवला. आम्ही तरूण उमेदवार दिलेत. राजकारणात तरूणांचा भरणा जास्त असेल तर त्याचे स्वागतच व्हायला हवे.

' मनसे'ला पाया आहे का?

नक्कीच. राज ठाकरे यांचा करिष्मा आणि त्यांचा प्रामाणिकपणा हा पक्षाचा पाया आहे. लोकलला लटकून जाणाऱ्या सामान्य माणसांचा आमचा पक्ष आहे.

शिवसेनेकडे तुम्ही शत्रू म्हणून पाहता का?

कशाला पहायचे? ते पालिकेत सत्ताधारी आहेत. त्यांच्या आधी काँगेस पक्ष सत्तेवर होता. या सर्वार्नी सर्व काही उपभोगले आणि जनतेला भोगायला लावले. हे दोन्ही पक्ष आमचे राजकीय शत्रू आहेत. आमचा पक्ष 'अनटेस्टेड' आहे.

शिवसेनाविरोधी भूमिका घेऊन कायम राजकारण होणार का?

शिवसेनेची ही शेवटची निवडणूक आहे. त्यांच्या विरोधात बोलतो, कारण ते सत्ताधारी आहेत. त्यांनी जनतेचे वाटोळे केले. मंुबईतली मोकळी मैदाने-फूटपाथ विकले. अर्थसंकल्पातील ५० टक्के रक्कम त्यांना खर्चच करता आली आही आणि पुन्हा आणखी मदत मागताहेत. प्रशासनावर त्यांचा वचक नाही. त्यामुळे त्यांच्या धोरणाविरोधात बोलणे स्वाभाविकच आहे.

शिवसेनाप्रमुख बोलतात, तसेच राज ठाकरेही बोलतात...

राज यांनी कधीही लोकभावनेला हात घातलेला नाही. ते कायम विकासाचे आणि वास्तव बोलतात. शिवसेनेच्या राज्यात जास्त संख्येने मंदिरे तोडली गेली. तेव्हा त्यांना हिंदुत्वाची आठवण कुठे झाली?

शिवसेनेचे उमेदवार पाडण्यावर भर देणार?

त्यांचे उमेदवार त्यांच्या कर्मानेच पडणार आहेत. आमचे जास्त उमेदवार जिंकणार म्हणजे त्यांचे उमेदवार पडणारच.

तुमच्या उमेदवारांना आथिर्क पाठबळ आहे का?

बिनपैशाची निवडणूक लढवता येत नाही, हे खरे आहे. उमेदवार जमेल तसा खर्च करतात. ज्या जागा महत्त्वाच्या, जिथे निवडून येण्याची जास्त संधी आहे, त्याठिकाणच्या उमेदवारांना पक्षाकडून थोडी मदत दिली आहे.

काँग्रेसच्या मतांच्या विभागणीमुळे युती सत्तेवर येईल....

मतांची विभागणी झाली तरी युतीचा पराभवच होईल. कारण दहा वषेर् त्यांनी मंुबईचे काय धिंडवडे काढले, ते लोकांना माहीत आहे.

कुर्ला-भांडुप पट्ट्यात बंद पडणारे उद्योग आणि मॉलमध्ये मराठी तरूणांच्या नोकरीच्या मुद्यावर झालेल्या आंदोलनाचे पुढे काय झाले?

हो, तेव्हा शिवसेनेत असताना आम्ही आंदोलन आंदोलन पुकारले होते. मॉलमध्ये किमान ७०० तरूणांना काम मिळायला हवे होते. पण १०० जणांनाच मिळाले. उद्धव ठाकरे यांनी तेव्हा आंदोलन थांबवण्याचा आदेश दिला.

मराठी-अमराठी वादात कुणाला न दुखावण्याची पक्षाची भूमिका आहे का?

मराठी ही या राज्याची भाषा आहे आणि मराठी माणसाला इथे मान द्यायलाच हवा, ही आमची भूमिका आहे. आमची भूमिका इतरांसारखी नाही. निवडणूक आली की इतरांना मराठीपण आठवते आणि इतरवेळी हिंदुत्व. अपयश झाकण्यासाठी ही मंडळी हे मुद्दे वापरतात.

मंुबईतल्या लोंढ्याविषयी भूमिका काय?

झोपड्यांचा पुनविर्कास झाला पाहिजे. कायदेशीर झोपडीधारकांना दजेर्दार राहणीमान उपलब्ध झाले पाहिजे. अनधिकृत झोपड्यांना, त्यांना पाणी आणि वीज पुरवठा करणाऱ्यांना चाप लावून. नवीन झोपड्या उभारण्यास मनाई केली पाहिजे. कुणालाही येऊन इथे घर बांधून आरामात राहणे आता शक्य नाही असे चित्र निर्माण होईल, तेव्हा इथे येणारे लोंढे आपोआप थांबतील.
 
posted by Rohit at 7:51 AM | Permalink | 0 comments
मनसेचा हायटेक प्रचार
कमी वेळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून आपला प्रचार करण्यासाठी निवडणुकीतील प्रत्येक उमेदवार काही ना काही युक्त्या शोधून काढत असतो. त्यात मतदारांना उमेदवाराचं नाव व त्याची निशाणी छापलेली असते, अशा छापील स्लीप देण्याचा कल जरा जास्तच असतो. मात्र या गोष्टीसाठी जास्त वेळ वाया जात असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार वैभवी चव्हाण यांनी नवं तंत्र अवलंबल आहे. मतदारांना ही स्लीप देण्यासाठी 'लॅपटॉप'चा वापर त्या करत आहेत.

वॉर्ड क्रमांक ५७ मधून वैभवी चव्हाण मनसेच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. बीएस्सी, बीएड करून शिक्षकी पेशा पत्करलेल्या वैभवी यांनी समाजासाठी आवश्यक त्या आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून द्यायच्यात त्यासाठीच राजकारण प्रवेश केल्याचं त्या सांगतात.

गटार, नाले, रस्ते यातच गुंतून न राहता आपल्या वॉर्डमधील आणि शहराच्या जवळपासच्या परिसरातील गरजू विद्यार्थ्यांसाठी पूर्णवेळ विजेची सोय असणारी अभ्यासिका व ग्रंथालय त्यासाठी सौरऊजेर्चा जास्तीत जास्त वापर करणं, आजी, आजोबांसाठी पार्क, करिअर गाइडलाइन सेंटर, विशेष स्वच्छता प्रोग्राम राबवण्याचा मनोदय व्यक्त करताना आपण शिक्षक असल्याने खोटी वचनं देत नाही, हे सांगण्यास वैभवी चव्हाण विसरत नाहीत.

वॉर्डातील साधारण पाच हजार मतदारांची नाव लॅपटॉपमध्ये समाविष्ट केली. त्यामुळे डोअर टू डोअर प्रचार करताना त्याच वेळेस मतदाराचं नाव विचारून त्याला मतदानाची स्लीप ताबडतोब देता येते. त्यासाठी यादी शोधण्यात वेळ घालवण्याची गरज नाही. त्यामुळे मतदारांचाही विश्वास वाढतो व जास्तीत जास्त मतदारांपर्यंत आम्ही पोहोचू शकतो, असं वैभवी चव्हाण यांनी सांगितलं.

शिवसेना, काँग्रेस व गंगाजल फ्रण्टचे उमेदवार माझ्या विरोधात उभे असले तरी मी यातील कुणालाही प्रतिस्पधीर्र् मानत नाही, असंही त्या सांगतात.
 
posted by Rohit at 7:48 AM | Permalink | 0 comments
नवनिर्माणाची मुहूर्तमेढ
Monday, January 29, 2007
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 15 लाख सदस्यांचे उदिष्ट ठेवणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यनोंदणीला मंगळवारपासून संपूर्ण राज्यात एकाच वेळी प्रारंभ झाला. नोंदणीच्या पहिल्या दिवशीच दोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्यासह विनय येडेकर आणि अतुल परचुरे हे अभिनेते नवनिर्माण सेनेत दाखल झाले. या सेनेचा एकाही सदस्याची नोंदणी बोगस नसेल यासाठी ' फूलप्रूफ फॉर्म ' तयार केल्याचे नवनिर्माण सेनाध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.

शिवाजी पार्कमध्ये उभारण्यात आलेल्या बूथमध्ये राज यांनी फॉर्मवर सह्या करून दुपारी सदस्यनोंदणीचे उद्घाटन केले. त्याचवेळेस संपूर्ण महाराष्ट्रात सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ झाला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राज म्हणाले , सदस्यनोंदणीचे कोणतेही उद्दिष्ट ठेवलेले नाही. संपूर्ण राज्यातूनच सदस्यनोंदणीसाठी चौकशी होत आहे , त्यावरून सदस्यनोंदणीला प्रचंड प्रतिसाद मिळेल याची खात्री आहे. एकट्या नगर जिल्ह्यातून एक लाख फॉर्मची मागणी आहे. किती नोंदणी झाली याची निश्चित माहिती 15 दिवसांत पूर्णपणे मिळेल. मात्र या अभियानात एकही बोगस नोंदणी होणार नाही याची काळजी घेतली आहे. फॉर्ममधील संपूर्ण माहितीची संगणकावर नोंद करण्यात येणार आहे.

फॉर्ममध्ये सदस्यांच्या जातीची माहिती विचारण्यात आली आहे. त्याबाबत विचारले असता ते म्हणाले , राज्यातील काही मतदारसंघ राखीव आहेत. त्यामुळे संभाव्य उमेदवारीची महिती असावी म्हणून या कॉलमचा समावेश केला आहे. पक्षाच्या दोन कार्यर्कत्यांमध्ये झालेल्या मारामारीबद्दल विचारले असता ते म्हणाले की , पक्षशिस्तीसाठी आचारसंहिता केली आहे. ही प्राथमिक सदस्यनोंदणी असून त्यानंतर सक्रीय सदस्यनोंदणीला प्रारंभ होईल. सक्रीय सदस्याच्या चार पानी फॉर्म असेल.

अतुल सरपोतदार म्हणाले की , राज्यात 14 लाख फॉर्म वितरित केले आहे. मुंबईत साडेपाच लाख फॉर्म वितरित झाले आहेत.
 
posted by Rohit at 3:52 AM | Permalink | 0 comments
विक्रमी सभेनंतर सदस्यनोंदणीचा धडाका
निळा, भगवा आणि हिरव्या रंगाचा झेंडा घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात नवा इतिहास घडवण्याची इच्छा बाळगून राज ठाकरे यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्व नोंदणीला महावीर जयंती आणि ईद ए मिलादचा मुहूर्त साधून राज्यभरात 11 एप्रिलपासून मोठ्या धडाक्यात सुरुवात होणार आहे. राज्यातल्या सर्व राजकीय पक्षांच्या सदस्य नोंदणीचे रेकॉर्ड मोडण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात केवळ मुंबईतच साडेपाच लाखांपेक्षा अधिक सदस्य नोंदवण्याचे उद्दिष्ट दिले असून बोगस फॉर्म शोधण्यासाठी नवनिर्माण सेनेची स्वतंत्र यंत्रणा काम करणार आहे.

नवनिर्माण सेनेची शिवाजी पार्कमध्ये विक्रमी सभा आयोजित करून राज ठाकरे यांनी शिवसेनेसह महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांना धक्का दिला होता. आता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाच्या नोंदणीमध्येही हेच धक्कातंत्र अवलंबण्यात येणार आहे. अकरा तारखेला मोहिमेचे उद्घाटन करण्यापूवीर् नऊ एप्रिलला वांदे येथील रंगशारदा सभागृहात मोहिमेची माहिती देण्यासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. या सभेत सदस्य नोंदणीचे फॉर्म आणि पावती बुक वितरित केले जातील. 11 तारखेपासून 30 तारखेपर्यंत राज्यभरात ही मोहीम राबवण्यात येईल. प्राथमिक सदस्यत्वाच्या फॉर्मची किंमत पाच रुपये ठेवण्यात आली आहे. प्रत्येक फॉर्मवर बार कोड, नवनिर्माण सेनेचा होलोग्राम असेल, फॉर्मच्या झेरॉक्स कॉपी चालणार नाहीत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात पालिकेच्या प्रत्येक वॉर्डमधील 50 कार्यर्कत्यांवर किमान 40 सदस्य नोंदविण्याचे उदिष्ट सोपवले आहे. कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी नसलेल्या तरुणांना पक्षाचे सदस्य करून घेण्याला प्रधान्य दिले जाणार आहे. फॉर्ममध्ये सदस्याच्या कौटुंबिक माहितीसह कोणत्या क्षेत्रात काम करतो, त्याचाही तपशील नोंदवून घेतला जाईल.

मुंबईत 227 वॉर्ड आहेत. प्रत्येक वॉर्डात दोन हजार फॉर्म असे गृहित धरून साडेचार लाखांपेक्षा अधिक सदस्य केवळ मुंबईतच पहिल्या टप्प्यात नोंदविले जातील, असा अंदाज एका कार्यर्कत्याने व्यक्त केला. अनेक राजकीय पक्षांत सदस्य नोंदणीचा आकडा फुगवण्यासाठी बोगस सदस्य नोंदविले जातात. पण नवनिर्माण सेनेत बोगस सदस्य नोंदणी अजिबात खपवून घेतली जाणार नाही, अशी तंबीच ठाकरे यांनी कार्यर्कत्यांना दिली आहे.
 
posted by Rohit at 3:48 AM | Permalink | 0 comments
हा निर्माण सेनेचा पहिला विजय!
क्रॉफर्ड मार्केटची जागा मातीमोल भावाने बिल्डरला विकण्याचा, तसेच वांद्यातील अन्य दोन भूखंडांचे आरक्षण उठवण्याच्या निर्णयाला महापालिकेने दिलेली स्थगिती हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला विजय असल्याची प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

शिवाजी पार्क येथील पक्षस्थापनेच्या सभेत ठाकरे यांनी यापुढे एकाही भूखंडावरचे आरक्षण उठवू देणार नाही, असा इशारा दिला होता. त्याचा परिणाम म्हणून महापालिकेने आपल्या निर्णयाला स्थगिती दिल्याचा दावा राज ठाकरे यांनी

केला आहे.
 
posted by Rohit at 3:43 AM | Permalink | 0 comments
मन से
डोळे आणि कान यात चार बोटांचं अंतर असतं. माझ्याबाबतीत चार दशकांचं अंतर असल्याचा दाखला मला काही दिवसांपूर्वी मिळाला. दचकू नका, मी खरंच बोलतोय. चार दशकं म्हटल्यावर माझ्या वयाचा चुकीचा अंदाज बांधायचीही गरज नाही. मी 32 वर्षांचा आहे!! त्या ऐतिहासिक घटनेला मात्र चार दशकं उलटून गेली आहेत. समजायला लागल्यापासून त्याच्या कहाण्या ऐकत आलोय.

शिवसेना या मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या संघटनेला चार दशके उलटून गेली. याची आठवण व्हायचं कारण की, परवा 19 मार्च रोजी शिवतीर्थावर झालेल्या सभेला मी उपस्थित होतो आणि त्याच शिवतीर्थावर झालेल्या पहिल्या शिवसेनेच्या सभेला माझे आजोबा शाहीर साबळे उपस्थित होते. चार दशकात तीन पिढ्यांचं अंतर होतं. फरक फक्त इतकाच की, शिवसेनेच्या पहिल्या सभेला आजोबा व्यासपीठावर होते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभेला मी व्यासपीठासमोरच्या रांगेत बसलो होतो.

आजही आमचे बाबा रंगात आले की, संयुक्त महाराष्ट्राच्या आठवणी सांगतात आणि मग हमखास विषय शिवसेनेच्या स्थापनेवर येतो. 'आंधळ दळतयं' या नावाचं मुक्तनाट्य त्या काळात फारच गाजलं होतं. मराठी माणसाच्या वेदनेचं आणि त्याच्या चुकीच्या वागण्याचं त्या काळातलं ते परिमाण होतं, असं त्याला म्हटलं तर वावगं ठरणार नाही. माझ्या समवयस्क पिढीला हे मुक्त नाट्य माहीत नसेलही आणि माहीत असण्याचं कारणही नाही. मी शाहिरांचा नातू म्हणून त्यांचा बायोडेटा मला पाठ आहे. मी नसतो तर मलाही त्या मुक्तनाट्याची फारशी माहिती नसती आणि माहिती करून घेण्याची इच्छाही नसती!! (आमच्या पिढीचा हाच तर दोष आहे. चांगल्याची जाण नाही आणि वाईटाला वाण नाही.)

शिवसेनेसारखी ज्वलंत संघटना उभी राहिली ती मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी. गेली चार दशकं आपण मराठी माणसं, ती संघटना आहे म्हणून तरलो. 'अरे आवाज कुणाचा ' म्हटलं तरी 'शिवसेनेचा' हा शब्द लगेच बाहेर पडतो. त्याला बाळासाहेब ठाकरे नावाचा करिश्माच कारणीभूत आहे.

अजूनही आमचे बाबा त्या काळातल्या आंदोलनांच्या आठवणी सांगतात. मंुबईतली ती दंगल आणि मग त्या नंतर शिवसेनेचं कार्य, याचं यथार्थ वर्णन करतात. काय, मराठी माणसात एवढी रग होती? असा प्रश्न पडावा अशा काही घटना आहेत. त्यांनी शिवसेनेच्या पहिल्या सभेचं वर्णन केलं तेव्हा आधी अतिश्योक्ती वाटायची. एवढी गदीर् कधी होते का? असा प्रश्न पडायचा. पण नंतर दर दसरा मेळाव्याला त्या गोष्टीचं प्रत्यंतर येऊ लागलं. मी कधी सभेला हजर नसायचो. पण दुसऱ्या दिवशीच्या पेपरात फोटो पाहिल्यावर खात्री पटायची. बाप रे, एवढी गदीर् होते बाबा!! गदीर्, त्या गदीर्ला आदेश देणारे ते बाळासाहेब ठाकरे. चुंबकीय शक्ती काय असते, ते त्यांच्याकडे पाहून आपसूक समजतं. पण या झाल्या सगळ्या ऐकीव गोष्टी. डोळे आणि कान यात चार बोटांचं अंतर असतं!!

ते अंतर परवाची सभा पाहिल्यावर एकदम कमी झालं. राज ठाकरे नावाचा करिश्मा त्या सर्व इतिहासाला कारणीभूत होता. आम्हा कलावंतांचा राजकारण्यांशी फारसा संबंध येत नाही. (आलाच तर तो दहा टक्क्यांची जागा मिळवणं, सेन्सॉर बोर्डावर सभासद होणं, दरवषीर् न चुकता संमेलनात सरकारला नव्या गोष्टींची मागणे करणं वगैरे वगैरे...) माझा राज ठाकरे या व्यक्तीशी संबंध आला तो एक कलाकार म्हणून. मी लिहिलेली-दिग्दशिर्त केेलेली बहुतांशी नाटकं त्यांनी पाहिली आहेत. त्या अनुषंगाने आमची भेट झाली आणि मी त्या कलाकार माणसाच्या प्रेमात पडलो. व्यंगचित्रकार म्हणून परिचित असलेले राज ठाकरे, संगीत-चित्रपट-साहित्य या सर्वांमध्येही अव्वल आहेत, हे त्यांच्याशी चर्चा केल्यावर कळलं. त्या चचेर्त आमच्याशी (मी, अंकुश, भरत) बोलताना राजकारण हा विषय कधीच नसतो. फक्त कलाकार या नात्याने केलेलं कौतुक आणि वेळोप्रसंगी दिलेले सल्लेच असतात.

राजकारणात आलेल्या स्थित्यंतरानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. जवळजवळ चार महिने थांबून पूर्ण विचारांती त्यांनी नवा पक्ष काढला. परवा महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा ट्रेलर त्यांनी सभेत दाखवून दिला. ती गदीर् कुठल्याही अपेक्षेने आली नव्हती. फार झालं आता. कोणीतरी आशेचा किरण दाखवावा इतकीच अपेक्षा होती. गदीर्त बहुतांशी तरुणच होते आणि ते कुठल्याही अमिषाला बळी पडून आलेले नव्हते. (जवळपास निवडणुकाही नाहीत, तर अमिष कसलं डोंबलाचं असणार?)

त्या दिवशी गल्लीच्या एका कोपऱ्यात गाडी पार्क करून, अंकुश-भरतसोबत दोन किमीची पदयात्रा करत सभेच्या ठिकाणी पोहोचलो. व्यासपीठावरून ते बोलत होते आणि मला बाबा आठवत राहिले. शिवसेनेच्या पहिल्या सभेचं जे वर्णन ऐकलंय, त्याचा अॅक्शन रिप्ले पाहतोय असं वाटत राहिलं. फरक फक्त मुद्द्यांचा होता. तेव्हा आणि आताच्या परिस्थितीचा होता. खरंच, स्वातंत्र्य मिळवून इतकी वर्ष झाली तरी अजूनही आपण चार मुद्द्यांवरच निवडणुका लढवतोय. अन्न-वस्त्र-निवारा-रोजगार! म्हणजे इतकी वर्ष काहीच घडलं नाही तर. त्यांनी मुद्दे मांडले. त्या मुद्द्यांवर कार्यवाही होईल याची मला खात्री वाटते.

सभेनंतर प्रतिक्रिया सांगणारे बरेच फोन आले. लोकांच्या प्रश्नांवर हसावं की रडावं समजेना? आपल्या आजूबाजूला काही घडत नाही, म्हणून आधीच आपण आरडाओरडा करतो. आता काही घडू पाहतंय, तर असं करून काय होणाराय? म्हणून आरडाओरडा करतोय. एक तरुण नेता काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करतोय तर, हे शक्यच नाही असं, काही लोकं ठणकावून कसं काय सांगू शकतात? 'कालाय तस्मै नम:' आपण सर्व काळावर सोडूया. तोच सर्व प्रश्नांची उत्तरं देईल. पण एक मात्र खरं, त्यांनी एकट्याने विचार मांडून काडीचाही उपयोग होणार नाही. त्या विचारांना आपणही थोडंसं पुढे नेण्याचं काम करायचं आहे. पक्ष कुठलाही असला, तरी समस्या सगळ्यांनाच भेडसावणाऱ्या आहेत. आत्ताच त्यावर जालीम उपाय शोधला नाही तर... तर मात्र येणारी पिढी आपल्याला दूषणं देईल. राजा जागा हो, रात्र वैऱ्याची आहे, अशी म्हण आहे. राजा जागा झालाय, आता प्रजेचीही तेवढीच जबाबदारी नाही का?

- केदार शिंदे
 
posted by Rohit at 3:37 AM | Permalink | 3 comments
राजच्या राज्यात...
बाळासाहेबांचा वारसा!

राज यांच्या पक्षाच्या पहिल्या सभेची तुलना अपरिहार्यपणे त्यांच्या काकांच्या शिवसेनास्थापनेच्या सभेशी होत राहील. राज यांच्या वागण्याबोलण्यात शिवसेनाप्रमुखांची ढब प्रकर्षाने दिसत आलेली आहेच, आपल्या पहिल्या 'स्वतंत्र' सभेतही राज यांनी हा 'वारसा' जपला.

सभेच्या सुरुवातीलाच खास 'सेना स्टायली'त फटाक्यांची आतषबाजी झाली, तेव्हा ते बाळासाहेबांप्रमाणेच 'जाहीर' वैतागून म्हणाले, हे चायनीज फटाके चिनी माणसांप्रमाणेच आहेत... थांबतच नाहीत.

त्रिशूळ, ढाल, तलवारी

पुढे, 'राज ठाकरे हा ज्वलंत नेता आहे. त्याच्या पक्षाचं नाव तेवढं आक्रमक वाटत नाही,' अशी टीका करणाऱ्यांना उद्देशून ते गरजले, 'मी आक्रमक आहे म्हणून आता काय माझ्या मुलांची नावं त्रिशूळ, ढाल, तलवारी अशी ठेवू?'

' पवार्रर्र' गजराचं घड्याळ

आपण शिवसेनेतून बाहेर पडलो, तेव्हा झालेल्या चविर्तचर्वणाचा समाचार घेताना राज म्हणाले, मी काय करणार याची बाकीच्यांनाच जास्त चिंता होती. राजकारण करायचे तर लवकर जागे व्हावे लागते, लोकांना भेटावे लागते, या शरद पवार यांनी दिलेल्या सल्ल्याच्या अनुषंगाने ते म्हणाले, आता मी लवकर उठतो. नवं घड्याळ आणलेलं आहे गजराचं. ते 'पवार्रर्रर्रर्र' असा गजर करतं!

चावटिका

शिवसेनाप्रमुखांच्या भाषणाप्रमाणेच राज यांनीही भाषणात अर्थवाही 'असंसदीय' भाषेचा पुरेपूर वापर केला. आपल्यात बदल घडले आहेत, याबद्दल 'खंत' व्यक्त करणाऱ्यांना उद्देशून ते म्हणाले, बदल हे प्रगतीचं लक्षण आहे. तुम्ही एक वर्षाचे असताना 'गादी ओली' करीत होतात, (राज यांचे शब्द अधिक 'थेट' होते) अजूनही तेच करता का?

मुंबईतील आरक्षित भूखंड विकू देणार नाही, असे निक्षून सांगताना राज यांनी तसा प्रयत्न करणाऱ्यांचे काय होईल, हे एकाच वाक्यात सूचित केले. 'या मैदानात जेवढे बांबू घातलेत ना...' या अर्ध्याच सोडलेल्या वाक्यातून राज यांनी व्यक्त केलेला आशय श्ाोत्यांमध्ये आरपार पोहोचला.

हसमुखराय, हसमुख चाय

राज ठाकरे यांच्या तोफखान्यातून प्रस्थापित राजकीय नेते सुटले नाहीत. मुख्यमंत्री विलासराव देशमुखांना भांग पाडण्यापलीकडे काही येत नाही, असा टोला लगावून राज यांनी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची संभावना 'हसमुख राय की हसमुख चाय' अशी केली. 'फुलाफुलांचे शर्ट घालणारे' दलित नेते रामदास आठवलेंच्या तोंडातल्या तोंडात गुरगुरत बोलण्याची फर्मास नक्कल केली. मात्र, राज यांनी भारतीय जनता पक्षाच्या एकाही नेत्याची 'आठवण' काढली नाही, हे राजकीयदृष्ट्या अन्वर्थक मानले जात आहे.

' टोल फ्री' नवनिर्माण

मुंबई-पुणे दुतगती महामार्गावर रविवारी देहू रोड टोल नाक्यावर (टोल भरला नाही अशी सूचना देणारा) सायरन सतत वाजतच होता, टोल न भरता जाणाऱ्या एवढ्या गाड्या कोणाच्या असा स्वाभाविक प्रश्ान् इतर चालकांना पडत होता... कारण राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या सभेला जाण्यासाठी पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातून निघालेल्या सुमारे 400 गाड्या रविवारी टोलला फाटा मारत मुंबईकडे रवाना झाल्या.

बारामतीच्याही शेतकऱ्यांचा पक्ष

शिशिर शिंदे यांनी नवनिर्माण सेनेच्या सर्वसमावेशकतेचे वर्णन करताना, हा शेतकऱ्यांचाही पक्ष आहे, असे सांगितले... थोडे थांबून 'बारामतीच्या शेतकऱ्यांचेही' असा जोड त्यांनी दिला, तेव्हा एकच हंशा पिकला. काँग्रेसच्या राजवटीत राज्याची स्थिती किती बिघडली, हे सांगताना ते म्हणाले की, काँग्रेसला शक्य असते, तर त्यांनी सूर्यप्रकाशाचेही लोडशेडिंग केले असते.
 
posted by Rohit at 3:33 AM | Permalink | 0 comments
सर्व काही वेल प्लॅन्ड!
शिवाजी पार्कमध्ये सभा घेणाऱ्यांना नेमकी किती गर्दी जमेल, याची भीती नेहमीच वाटत असते. याच भीतीपोटी 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना करताना मैदानामधोमध स्टेज उभारले होते. मात्र राज यांच्या सभेसाठी गर्दी जमवण्याची काळजी घेतानाच इव्हेन्ट मॅनेजमेंटवाल्यांनी चोख नियोजन केले होते. शिवाजी पार्क जिमखान्याच्या गच्चीतील गर्दी एखादी क्रिकेट मॅच पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीलाही मागे टाकणारी होती.

स्टेजवर शिशिर शिंदे, माजी आमदार दीपक पायगुडे, शिरीष पारकर, दिगंबर कांडरकर, अतुल सरपोतदार, शिरीष सावंत, वसंत गीते, श्वेता परुळेकर तसेच प्रवीण दरेकर या मोजक्याच नेत्यांची लगबग सुरू होती. राज येण्यापूवीर् दीपक पायगुडे यांनी भाषण केले. या भाषणाला बरीच दाद मिळाली. राज यांच्या आगमनानंतर शिशिर शिंदे यांनी भाषण केले. मात्र ते वाचून दाखवल्याने त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

राज यांचे आगमन होताच नाशिक बाजा आणि आतषबाजीचा धडाका सुरू झाला. याप्रसंगी राज यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेआधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला घातलेला हार अनेकांच्या चचेर्चा विषय ठरला. अतिशय साध्या पद्धतीने आगमन झालेल्या राज यांनी बोलायला सुरुवात केली तेव्हा शिवाजी पार्कमध्ये मुंगीलाही शिरायला जागा नव्हती. मैदानात लावलेल्या प्रचंड आकाराच्या स्क्रिनवरून स्टेजवरच्या हालचाली प्रत्येकजण डोळ्यात साठवत होता. पाणावल्या डोळ्यांनी गदीर्कडे पाहताना भारावलेला राज हा सभेचा सर्वात हृद्य क्षण होता.
 
posted by Rohit at 3:31 AM | Permalink | 0 comments
मूलभूत प्रश्न 46 वर्षे का सोडवले नाहीत? ; राज ठाकरे.
महाराष्ट्रस्थापनेला 46 वषेर् झाल्यानंतरही नेते वीज-पाणी-रस्ते-नोकऱ्या याच चार प्रश्नांवर निवडणुका लढतात, हे प्रश्न सोडवण्याची आश्वासने देतात, ही शरमेची गोष्ट आहे, असे ठणकावत राज यांनी राज्यर्कत्या काँग्रेसच्या पुढाऱ्यांना धारेवर धरले.

रेताड, उजाड महाराष्ट्रात आमदार-मंत्र्यांच्याच जमिनी हिरव्यागार असतात, इतर प्रांतांना पाणी मिळू द्यायचे नाही, ते मोठे होऊ नयेत म्हणून झटायचे, ही कसली विकृती, असा संतप्त सवाल राज यांनी केला. या भिकार राजकारण्यांनी नासवण्यासाठी नव्या पिढ्या जन्माला येतात काय, असा प्रश्न विचारून राज म्हणाले की आपल्या राज्यात माणसे जन्मतात, तरुण होतात, म्हातारी होतात आणि मरून जातात. नोकऱ्या-शिक्षणाचे सुख काही मोजक्यांनाच लाभते. आज राज्यात मिळणारे शिक्षण हे 'एक्स्पायरी डेट उलटून गेलेले' शिक्षण आहे, अशी टीका करीत राज यांनी सगळ्या 'शिक्षणसम्राटां'ची संभावना 'बेरोजगारीचे काखानदार' अशा शब्दांत केली.

सामान्य करदाता सरकारला कर भरतो, तेव्हा तो सरकारशी केलेला करार असतो... त्या कराराचे पालन सरकारी यंत्रणा करते की नाही, यासाठी आपला पक्ष सरकारला जाब विचारेल, सरकारी अधिकाऱ्यांनाही धारेवर धरेल, असे आश्वासन राज यांनी दिले. मुंबईतील पालिका निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ अप्रत्यक्षपणे फोडत राज यांनी मुंबईतला एकही आरक्षित भूखंड विकू दिला जाणार नाही, असा इशाराही देऊन टाकला. पालिकेच्या कंत्राटदारांवरही 'नजर' ठेवली जाईल आणि त्यांच्या कामाचा जाब विचारला जाईल, असे ते म्हणाले.

आपल्या पक्षाचा झेंडा घेतलेल्या युवकांच्या आईवडिलांना, आपला मुलगा वाया गेला, असे वाटणार नाही; त्यांच्या घरच्यांच्या चेहऱ्यावर सुख आणि समाधान असेल, असा दिलासाही राज यांनी दिला आणि महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला साथ द्या, असे आवाहन केले
 
posted by Rohit at 3:31 AM | Permalink | 0 comments
शिवाजी पार्क... ठाकरे... आणि तरुणाई!
शिवाजी पार्कवर 30 ऑक्टोबर 1966 मध्ये शिवसेनेची, तर त्यानंतर तब्बल चार दशकांनी म्हणजेच रविवारी 19 मार्च 2006 ला महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची स्थापना... या मधल्या काळात जमाना बराच बदलला... मात्र तरीही इतिहासाची पुनरावृत्ती केली ती एकाच त्रिसूत्रीने! ती म्हणजे 'शिवाजी पार्क', 'ठाकरे' आणि सळसळती 'तरुणाई'!

राज यांच्या सभेसाठी दुपारपासूनच लाखो पावले शिवाजी पार्कच्या दिशेने वळत होती. गदीर्चे वय 14 ते 30 भोवती घोटाळणारे... महिलांचे प्रमाण डोळ्यात भरणारे आणि भगवे, निळे, पांढरे आणि हिरवे झेंडे फडकवणाऱ्या तरुणांच्या जोशाने भारलेलं वातावरण! माहीम ते परळपर्यंत रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्या गदीर्च्या भव्यतेची साक्ष देत होत्या. काही गाड्या कोहिनूर कंपाऊंडमध्येही लागल्या होत्या. सायंकाळी पाचपर्यंत गदीर्ने उच्चांक गाठला. औरंगाबाद, सांगली, अहमदनगर, पुणे आदी ठिकाणांहून झुंडीने येणाऱ्या कार्यर्कत्यांच्या समुदाने शिवाजी पार्क तुडुंब भरणार, यात शंकाच नव्हती.

राज राहत असलेल्या 'कृष्णभवन'वर फडकणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा आणि इमारतीजवळची गदीर् अनेकांचे लक्ष वेधत होती. आपला नेता कधी बाहेर पडणार, या प्रतीक्षेत असणाऱ्या तरुणांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली होती. केवळ निळा, तसेच हिरवा रंगाचा झेंडा घेऊन आलेल्या तरुणांचा जमाव अस्तित्व लपवू शकत नव्हता.

सांगलीमधून आलेल्या तरुणांच्या एका मोठ्या गटाने पक्षाच्या झेंड्याच्या रंगाचे टी शर्टच घातले होते. यामुळे गदीर्त हा गट उठून दिसत होता. यातल्या दीपक खाडे या तरुणाने सांगितले की, याआधी आपण शिवसेनेचे दहा हजारांहून भगवे टी शर्ट शिवून घ्यायचो. आता ही जुनी ओळख असल्याने दोन दिवसांतच नव्या पक्षाचे टी शर्ट शिवून मिळाले! हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि आनंद ओसंडून वाहात होता.

शिवाजी पार्क परिसरात अनेक ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे झेंडे, बिल्ले विकणाऱ्या तरुणांची गदीर् होती. मात्र ते विकणाऱ्यांमध्ये उत्तर भारतीय तरुण आघाडीवर होते. शिवाजी पार्कमध्ये उभारलेले भव्य स्टेज आणि शेजारचे चार प्रचंड स्क्रीन दूरवरूनही राज यांना पाहण्याची संधी देत होते.
 
posted by Rohit at 3:30 AM | Permalink | 0 comments
महाराष्ट्र पादाक्रांत करीनच!... राज साहेब.

अवघ्या जगाला हेवा वाटावा , एवढा माझा महाराष्ट्र मोठा बनवीन , अशी प्रतिज्ञा करीत युवानेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी शिवाजी पार्कवरील विराट सभेत स्वत:ला महाराष्ट्राला समर्पित केले. ' महाराष्ट्र माझा , मी महाराष्ट्राचा ' या घोषणेचा पुनरुच्चार करून राज यांनी महाराष्ट्राच्या हिताआड येणाऱ्या कोणत्याही गोष्टीशी तडजोड करणार नसल्याचे ठामपणे सांगितले. प्रगत , आधुनिक महाराष्ट्राचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र पादाक्रांत करून दाखवीनच , असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

राज यांचे काका , शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कावरील गाजलेल्या सभांची आठवण करून देणारी प्रचंड गर्दी , तरुणांचा जल्लोष , फटाक्यांची आतषबाजी , झेंड्यांचा , फलकांचा महासागर , वाद्यांचा महागजर अशा भारलेल्या वातावरणात राज यांच्या पक्षाची ही पहिलीवहिली सभा झाली. राज यांनी शिवसेनाप्रमुखांच्याच शैलीत तरुणांच्या शिक्षण आणि नोकरीसारख्या प्रश्ानंचा ऊहापोह केला आणि तेच आपला ' टागेर्ट ऑडियन्स ' असल्याचे दाखवून दिले.

मुंबईतील आगामी महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी रस्ते , लोकलप्रवास आदि मुंबईच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना त्यांनी हात घातला आणि महापालिकेचे 12 हजार कोटींचे बजेट कंत्राटदारांच्या खिशात जाऊ देणार नाही , असा निर्धार व्यक्त केला. राज्यातील प्रश्ानंबाबत मंत्र्यांबरोबर सरकारी अधिकाऱ्यांनाही यापुढे जाब विचारला जाईल , असे ते म्हणाले.

धर्मजातीच्या राजकारणापासून शेतीपर्यंत अनेक विषयांना स्पर्श करणाऱ्या जवळपास 55 मिनिटांच्या जोशपूर्ण भाषणात राज यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या विद्यमान सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांवर तुफान टीका केली. महाराष्ट्रातील शेतीही ' ग्लॅमरस ' करून दाखवण्याचा विडा उचलला.

शिवाजी पार्क उभे आडवे भरून टाकणाऱ्या जनसमुदायासमोर उभे राहिलेले राज सुरुवातीलाच भावुक होत म्हणाले की , लहानपणापासून शिवसेनाप्रमुखांबरोबर या मैदानावर शिवसेनेच्या सभांना येत होतो , पण आपण स्वत: पक्ष स्थापन करू , याच मैदानावर भाषणाची वेळ येईल , असे वाटले नव्हते. 66 साली काकांनी शिवसेना स्थापन केली , तेव्हा आपले आजोबा हजर होते. ' हा बाळ या क्षणाला मी महाराष्ट्राला अपर्ण करीत आहे ', असे ते म्हणाले होते. आपल्यामागे कोणी नाही , तेव्हा आपणच स्वत:ला महाराष्ट्राला समपिर्त करीत आहोत , असे राज यांनी जाहीर केले , तेव्हा जनसमुदायातून भावनेची लाट उसळली.

कार्यर्कत्यांच्या बळावरच आपण नवा पक्ष स्थापन करण्याची हिंमत करू शकलो , असे सांगून राज यांनी पक्षाचे पहिले धोरण जाहीर केले... ' कोणीही कोणाच्याही पाया पडायचे नाही! '... शिवसेना संस्कृतीशी आपली ' सेना ' काही अंशी फारकत घेणार आहे , असेच त्यांनी सूचित केले. त्याचप्रमाणे ' काँग्रेसी ढोंगीपणा ' न करता आपल्या पक्षात मुस्लिम आणि दलितांनाही ' योग्य ' स्थान दिले जाईल , असेही त्यांनी स्पष्ट केले.

काही धर्मांधांमुळे आपण ' त्यां ' च्यातील चांगली माणसे नाकारायची का , अब्दुल कलाम आणि इरफान पठाण नाकारायचे का , असा सवाल त्यांनी केला. मात्र , कोणत्याही समाजापुढे लांगूलचालन करणार नाही , निवडणुका आल्या म्हणून ' टोप्या ' घालणार नाही , असेही त्यांनी निक्षून सांगितले. मोहंमद पैगंबरांचे चित्रच नाही , तर व्यंगचित्र कसे काढले , असा सवाल करून राज यांनी या प्रश्ानवर आपण मुस्लिमांच्या बाजूने असल्याचे स्पष्ट केले. कोणत्याही धर्माचा अपमान करणे चुकीचेच आहे , असे सांगून राज म्हणाले की , एम. एफ. हुसेन यांनी हिंदू देवतांची आणि भारतमातेची नग्नचित्रे काढली , त्याच्या निषेधार्थही मुस्लिमांनी एवढाच तीव्र निषेध करायला हवा.

दलित नेत्यांना निवडणुकांपुरतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आठवतात , असे सांगत या नेत्यांवर राज यांनी टीकेची तोफ डागली. ज्या देशात नोकऱ्याच नाहीत , तिथे आरक्षणे देऊन , नामांतरे करून , सामान्य जनतेच्या भावना भडकावण्याचेच काम या नेत्यांनी केले आहे , असे सांगून राज म्हणाले , ' माझ्या पक्षाच्या धोरणात नामांतरं नाहीत , हे सगळं झूट आहे. जनतेपुढचे खरे प्रश्ान् पोटापाण्याचे आहेत.
 
posted by Rohit at 3:28 AM | Permalink | 0 comments
राज ठाकरे यांचे सहकारी कोण?
महाराष्ट्र निर्माण पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पक्षस्थापनेच्या अगोदरपासूनच सहकारी निष्ठावंतांची साथ लाभली आहे. सुरुवातीपासून आपल्याबरोबर आहेत त्यांना पक्षात मानाचे स्थान मिळेल, असा शब्द राज यांनी दिला आहे. पक्षाची स्थापना करताना आणि शिवाजी पार्कचा मेळाव्याच्या आयोजनात राज यांची पत्नी शमिर्ला यांची साथ व सहभाग मोलाचा आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेच्या मेळाव्यास व्यासपीठावर दीपक पायगुडे, शिशिर शिंदे, प्रवीण दरेकर, राजन शिरोडकर, अतुल सरपोतदार, शिरीश पारकर, वसंत गीते, श्वेता परूळकर हे प्रमुख सहकारी उपस्थित होते. राज यांच्या जयजयकाराच्या घोषणा देणाऱ्या आणि बेंजो-बँडच्या तालावर बेधुंदपणे नाचणाऱ्या लक्षावधी तरुणांपुढे भाषणाची संधी मिळाली म्हणून पायगुडे, शिंदे, सरपोतदार, पारकर, दरेकर भारावून गेले.

पायगुडे दोन वेळा पुण्यातून आमदार म्हणून निवडून आले. गेल्यावेळी त्यांचा अवघा अडिचशे मतांनी पराभव झाला. राज यांचे ते खंदे समर्थक. निवडणुकीत संपर्कप्रमुख व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात काम केले. पुण्यात त्यांचे सार्वजनिक काम खूप आहे. मिलिटरी स्कूल सुरू केले. दरवषीर् सामूहिक विवाह आयोजित करतात. लोकसेवा सहकारी बँकेचे ते प्रमुख आहेत. दहा रुपयांत जेवण योजना त्यांनी सुरू केली.

शिंदेे माजी आमदार. शिवसेनेचे उपनेते होते. एक वेळ नगरसेवकही होते. लढाऊ-आक्रमक प्रतिमा. धारा तेल-पाम तेल आंदोलन, वानखेडे स्टेडियम खेळपट्टी उखडणारे आंदोलन त्यांनी घडवले. सामाजिक प्रश्नांवर त्यांनी अनेक आंदोलने उभारली. साहित्य, कला, क्रिडा आदी सर्व क्षेत्रात चौफेर संपर्क. उद्धव की राज असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा त्यांनी राज यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. मुलुंडमधील जॉगिंग ट्रॅक आणि दरवषीर् होणाऱ्या बाल मेळ्याचे शिल्पकार.

दरेकर विद्याथीर् सेनेत काम करणारा राज यांचा खंदा कार्यकर्ता. राजचे समर्थक म्हणून तीन वेळा महापालिकेचे आणि गेल्या निवडणुकीत विधानसभेचे तिकीट सेनेने त्यांना नाकारले. मुंबै बँकेचे माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक, सहकार व लेबर क्षेत्रात त्यांचे काम आहे. कार्यर्कत्यांचा मोठा फौजफाटा आहे, उत्तम संघटक म्हणून नाव आहे.

शिरोडकर प्रशासकीय क्षमता असलेला राज यांचा विश्वासू सहकारी. शिवाजी पार्कवरील सभेच्या यशात त्यांचाही वाटा असल्याचे सांगितले जाते. कार्यक्रमाचे आयोजन, झेंडे, बिल्ले, स्टिकर्सच्या निमिर्तीत पुढाकार.

अतुल सरपोतदार हा शिवसेना नेते मधुकर सरपोतदार यांचा पुत्र. उद्धव-राज संघर्षात त्यांनी सतत राजला साथ दिली. अतुल ोांनी राज यांच्यासमवेत राज्यभर दौरे केले. शिवसेनेचा नवी मुंबईचा संपर्कप्रमुख म्हणूनही काम केले. पारकर हॉटेल व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत. मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यवस्थापकपदाचा अनुभव, इंग्रजीवर प्रभुत्व असलेले. विद्याथीर् सेनेत सरचिटणीस होते.

श्वेता परूळकर यांची स्वत:ची आदित्य व्हीडिओ कंपनी आहे. राज यांनी सेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिल्यापासून नव्या पक्षाची घोषणा करेपर्यंतची दाखवण्यात येणारी 5 मिनिटांची फिल्म त्यांनी स्वत: केली आहे. राज यांच्या शिवसेनाप्रमुखांवरील फोटोबायोग्राफी पुस्तकाच्या निमिर्तीतही त्यांचा मोलाचा वाटा होता. आमदार बाळा नांदगावकर हे पडद्यामागून काम करतात. यााखेरीज अविनाश अभ्यंकर, नितीन सरदेसाई, केदार हुंबाळकर, राजू परूळेकर अशी मोठी फळी राज यांच्याबरोबर आहे.
 
posted by Rohit at 3:26 AM | Permalink | 0 comments
शिवाजी पार्कवर आज खुलणार 'राज'

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा इतिहास घडवण्याची जिद्द आणि इच्छा बाळगत राज ठाकरे यांनी स्थापन केलेल्या ' महाराष्ट्र नवनिर्माण सेने ' ची पहिलीवहिली सभा रविवारी शिवाजी पार्कावर होत आहे. ही सभा ' प्रचंड यशस्वी ' करण्यासाठी राज ठाकरे यांच्या खंद्या समर्थकांनी आणि कार्यर्कत्यांनी कंबर कसली आहे. सभेसाठी राज्यभरातून तब्बल दीड ते दोन लाखांची गर्दी होईल , असा विश्वास व्यक्त केला जात आहे. राज ठाकरे यांच्या करिष्म्यावर फिदा असलेल्या तरुण वर्गासह दलित , मुस्लिम वर्गातील तरुणांसह महिलांची लक्षणीय उपस्थिती हे सभेचे वैशिष्ट्य राहील.

सर्वसामान्यांपासून ते राजकीय क्षेत्रात काही महिने पक्षाविषयी उत्सुकता निर्माण करण्यात यशस्वी ठरलेल्या राज यांच्या सभेला कसा प्रतिसाद मिळेल , हा उत्सुकतेचा विषय ठरला आहे. शिवाजी पार्कावर सभा यशस्वी करून ' हम भी कुछ कम नहीं ' ची चुणूक देण्याच्या हेतूने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सगळी यंत्रणा रात्रंदिवस राबत आहे. सभेसाठी राज यांची प्रचंड आकारांची होडिर्ंग्ज , वैशिष्ट्यपूर्ण पोस्टर्स , बॅनर्स लक्षवेधक आहेत. सभेची जबाबदारी मनोज हाटे , राजन शिरोडकर , शिरीष पारकर , प्रवीण दरेकर , शरद सावंत , संजय घाडी आदींवर सोपवलेली आहे.

पक्षाची घोषणा अनोख्या पद्धतीने करणाऱ्या राज यांच्या सभेचे व्यासपीठ तुलनेने साधे असेल. सायंकाळी सहा-साडेसहा वाजता सुरू होणाऱ्या सभेत सुरुवातीला शिशिर शिंदे , अतुल सरपोतदार , शिरीष पारकर , प्रवीण दरेकर , संजय चित्रे , संजय घाडी आदींची भाषणे झाल्यानंतर खुद्द राज यांचे भाषण होणार असल्याचे कळते.

झेंड्यातील निळा , हिरव्या रंगांच्या आकर्षणापोटी या सभेसाठी दलित समाजातील 25 हजार लोक येणार असून मुस्लिम समाजातील तरुणां-बरोबर महिलांची संख्याही मोठी असेल , असे कळते. रायगडमधून सात ते आठ , ठाण्यातून 30-40 , नाशिकमधून 15 , पुण्यातून 15-20 तर नगरमधून पाच-सात हजार कार्यकतेर् सभेसाठी अपेक्षित आहेत.

राज्यभरातून निव्वळ पाच ते सहा हजार गाड्या येणे अपेक्षित आहे. बसेस , रेल्वे , एसटी यांतून येणाऱ्यांची संख्या वेगळीच आहे. केवळ मुंबईतूनच दोन ते अडीच हजार गाड्या येतील. यात उत्तर मुंबईतून 200 बसेस , तीस ट्रक , दहा टेम्पो तर कुर्ल्यातून दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली 113 बसेस येणार आहेत. दक्षिण मुंबईतून अरविंद गावडे 40 बसेस , 20 टेम्पो , शंभरएक मोटरसायकलींवरून सुमारे पाच हजार समर्थक घेऊन येतील. मीरा-भाईंदर , बेहरामबाग , भारतनगर आदी भागांतून हजारो कार्यकतेर् हाजी शेख घेऊन येणार आहेत. याशिवाय राज आणि त्यांचा नवा पक्ष या विषयावर विविध मान्यवरांचे लेख असणाऱ्या ' प्रवाह ' चा विशेषांकाचे या वेळी प्रकाशन होणार असल्याची माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली.
 
posted by Rohit at 3:22 AM | Permalink | 0 comments
राजा, राजधर्म वोळखावा...
गर्दी जमवण्याचं एक तंत्र असतं. ते आपल्याला अवगत आहे, हे आपल्या सभांच्या फोटोंवरून दिसतं. पण जमलेली गर्दी टिकवण्यासाठी हे तंत्र उपयोगी ठरतंच, असं नव्हे. महाराष्ट्रात शरद जोशी, डॉ. दत्ता सामंत आदींच्या हजारोंच्या सभा झाल्या. पण पुढे काय झालं?

.......................................

प्रिय राज,

आज आपल्या राजकीय कारकिदीर्तला अत्यंत महत्त्वाचा दिवस. गेल्याच आठवड्यात आपण स्थापन केलेल्या 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'ची आज पहिली जाहीर सभा होत असताना जनतेच्या, विशेषत: महाराष्ट्रातच जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या मराठी समाजाच्या आपल्याकडून विशेष अपेक्षा आहेत. त्या आपल्या कानावर आल्या असतीलच. त्यांचं पुन्हा एकदा स्मरण करून देण्यासाठीच हा पत्रप्रपंच.

जाहीर स्वरूपाच्या वृत्तपत्रीय लिखाणात 'मी'चा उल्लेख टाळावा, असा संकेत आहे. पण तो दूर सारून इथे मी येतोच. याचं कारण चाळीस वर्षांपूवीर् आपल्याच काकांनी - श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी याच शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला जाहीर मेळावा आयोजित केला, त्या वातावरणाचा दीर्घ पल्ल्याचा परिणाम माझ्या व माझ्यासारख्या पोरसवदा वयाच्या हजारो तरुणांवर झाला. त्यामुळेच चाळीस वर्षांनंतर आपल्या नव्या साहसाची पहिली परीक्षा होत असताना त्या मेळाव्याची तुलना मनातल्या मनात होणं अपरिहार्य आहे. ठाकरेंनी त्या मेळाव्यात मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठीच्या लढाईचं रणशिंग फुंकलं. त्यावेळी त्यांचं जे वय होतं, त्याच वयोगटात आपण आज आहात. पण ही तुलना इथेच संपते. कारण बाळासाहेबांनी ही संघटना स्थापन करताना 'राजकारणाचं गजकर्ण नको', असं म्हणत टाळ्या मिळवल्या. पण दोनच वर्षांनी आलेल्या महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरून तेच गजकर्ण स्वीकारलं. आपण तर राजकीय पक्ष म्हणूनच रिंगणात उतरलात. त्यामुळे राजकारण-विशेषत: निवडणुकांचं राजकारण-आपल्याला र्वज्य नाही, हे ओघानं आलंच. या राजकारणाच्या रिंगणात उतरून शड्डू ठोकायचे, तर आपला प्रतिस्पधीर् कोण, आणि त्याची शक्तिस्थानं कोणती, याचं नीट भान असावं लागतं. तसं आपल्याला आहे, याची जाणीव शिवाजी पार्कवर जमलेल्या आपल्या चाहत्यांना आणि उत्सुक जनतेला करून द्यावी लागेल.

संघटना म्हणून राजकारणात उतरणाऱ्यांना काही स्वातंत्र्यं असतात. ती शिवसेनेने उपभोगली. ठाकरेंनी आपल्या राजकीय चालींना सामाजिक आंदोलनांची डूब दिली व त्यात अनेकदा ते यशस्वीही ठरले. मराठीचा प्रश्ान् त्यांनी राजकीय खेळी म्हणून यशस्वीपणे राबवला आणि हिंदुत्त्वाच्या मुद्द्याला धामिर्क नव्हे, तर सांस्कृतिक किनार लावली. ही कसरत ठाकरे करत होते, म्हणूनच शिवसेना वाढत राहिली. आपण सेनेच्या नेतृत्त्वालाच आव्हान देऊन नवं घरकुल उभारलं असल्याने, आपली चालही वेगळी आहे, हे सिद्ध करावं लागेल. त्यात आपल्याला यश आलं, तर अवघड शिखरं सर करण्याचं बळ आपल्या पायांत आणि तशी धमक आपल्या उरात असल्याचं स्पष्ट होईल.

शिवसेनेतून बाहेर पडल्यावर आपण महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यात फिरलात. सर्वत्र आपले उत्स्फूर्त स्वागत झाले. आपल्या हातात कोणतीही मोठी संघटना नाही किंवा देण्यासारखं काहीही नाही. तरीही गावागावात लोक आपल्या स्वागतासाठी जमले. ही गदीर् आश्वासक आहे, तशीच आव्हानात्मकही. गदीर् जमवण्याचं एक तंत्र असतं. ते आपल्याला अवगत आहे, हे आपल्या सभांच्या फोटोंवरून दिसतं. पण जमलेली गदीर् टिकवण्यासाठी हे तंत्र उपयोगी ठरतंच, असं नव्हे. महाराष्ट्रात शरद जोशी, डॉ. दत्ता सामंत आदींच्या हजारोंच्या सभा झाल्या. पण पुढे काय झालं? डॉ. सामंतांची कामगार चळवळ मुंबईतही टिकली नाही आणि शरद जोशींना स्वत:ला संसदेत जाण्यासाठी शिवसेनेचा आधार घ्यावा लागला. हे असं घडलं याचं कारण गदीर्तला प्रत्येक जण स्टेजवरच्या प्रकाशझोतातल्या नेत्यामध्ये स्वत:चं भवितव्य पाहत असतो. ते हरवलं की त्याचा भ्रमनिरास होतो आणि त्याच्या मनातल्या मूतीर् आणि पुतळ्यांच्या बाहुल्या बनतात.

लोक अमिताभ बच्चन, शाहरूख खान, सलमान खान आणि माधुरी दीक्षितला पाहण्यासही गदीर् करतात. पण त्या गदीर्त आणि आपल्याला लाभलेल्या गदीर्त फरक आहे. लोक नटांना बघतात, तेव्हा त्यांना केवळ चेहरा पाहायचा असतो. नेत्यामध्ये ते स्वत:ला शोधत असतात. अशा वेळी नेत्याने आपल्यामध्ये जनतेच्या आशाआकांक्षांना स्थान आहे की नाही हे तपासायला हवं. ग्रामीण भागातल्या जनतेच्या आशांचं प्रतीक बनायचं, तर बाजरीची भाकरी आणि पिठल्याची चव मनापासून आवडायला हवी. जनतेसमोर मीठ-भाकरीबद्दल बोलायचं आणि नंतर पिझ्झा हाणायचा, असं वागणाऱ्या नेत्यांना काही काळ ग्लॅमर राहतं, पण ते बेगड अकाली उघडं पडतं आणि खेळ खल्लास होतो. 'न् द्यद्गड्डस्त्रद्गह्म द्बह्य द्मठ्ठश्ा2ठ्ठ ड्ढ4 ह्लद्धद्ग ष्श्ाद्वश्चड्डठ्ठ4 द्धद्ग द्मद्गद्गश्चह्य', असं म्हणतात. सुदैवाने शिवसेनेत फूट पाडून आपला इमला बांधण्याचा आपला डाव नाही. आपण आपली नवी टीम उभी करत आहात. या पवित्र्याचे फायदे आणि तोटेही आहेत. नव्या रक्ताला वाव मिळाल्याने महाराष्ट्रात खरंच नवनिर्माण होईल, अशी आशा अनेकजण बाळगून आहेत. पण नव्या रक्ताला कोणती चटक लागते, यावर बरंच काही अवलंबून आहे. गुजरातेत चिमणभाई पटेल यांच्या विरोधात तरूणांचं नवनिर्माण आंदोलन उभं राहिलं, त्यास जयप्रकाश नारायणांचा पाठिंबा व आशीर्वाद मिळाला. आसामात तरुणांनीच 'आसाम गण परिषद' उभारली. यातल्या तरुणांचं पुढे काय झालं? महाराष्ट्रात नवनिर्माण करायचं तर तुम्ही एकटे पुरेसे नाही. तुमच्या आसपास तशाच वृत्तीची फौज हवी. खाजगी बैठकीत ग्लासं भरून देणारे आणि तुमच्या प्रत्येक वाक्याला टाळी देणारे, मागणारे सोबती औट घटकेच्या करमणुकीसाठी ठीक, पण ते जनरल बनू शकत नाहीत. त्यासाठी वेगळी मानसिकता लागते. ती असणारे किती आहेत, त्याचा शोध घ्यावा लागेल.

प्रखर हिंदुत्त्वाच्या मुशीत आपण वाढलात आणि आपलं राजकारण बहरलं. वेगळी वाट चालताना या मूल्यांचं काय करणार? ती सोडायची, तर त्याच मुशीत वाढलेल्या आपल्या विद्याथीर् सेनेच्या कार्यर्कत्यांचं मन कसं वळवणार? शरद पवार, प्रमोद महाजन, नारायण राणे आदी आपल्या आसपास राजकारण करणाऱ्या अन्य पक्षांच्या नेत्यांपासून आपण किती अंतर ठेवणार? आणि विशेष म्हणजे शिवसेनेबरोबर आपला राजकीय व्यवहार कसा असणार? या सर्व प्रश्ानंची उत्तरं जाणून घेण्यासाठी सारे उत्सुक आहेत. ती पहिल्याच सभेत मिळतील, अशी अपेक्षा नाही. पण विचारांची दिशा कळली, तर आपला प्रवास कोणत्या दिशेने आहे, याचा अंदाज येईल.

शंभू राजांना लिहिलेल्या एका पत्रात समर्थ रामदासांनी म्हटलं आहे, 'राजा, राजधर्म वोळखावा। यत्ने अंगी बाणवावा। युक्ते अंमल करावा। राजकारणे।।' आपल्याकडूनही अशीच अपेक्षा बाळगता येईल?

शुभेच्छा!

- भारतकुमार राऊत
 
posted by Rohit at 3:21 AM | Permalink | 0 comments
सेक्युलर राज ठाकरे..
गुरुवारी मुस्लिम आणि शीख नेत्यांना समारंभपूर्वक भेटल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सेक्युलर रंग अधिकच उजळून निघाला आहे. शुक्रवारी त्यांना दलित कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर भेटून गेले. शनिवारी उत्तर भारतीयांची गदीर् कृष्णभुवनवर होणार आहे.

मुंबईतली सर्वात मोठी मशीद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बडी मशिदीच्या मौलवींसह भेंडीबाजार, कुर्ला, गोवंडीतील मुुस्लिमांनी शुक्रवारी दुपारी राज यांची निवासस्थानी भेट घेऊन 19 तलवारी भेट दिल्या. मुस्लिम म्हणून आमच्यावर सदैव अन्याय होत असल्याची भावना त्यांनी राज यांच्याकडे मांडली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्यामध्ये हिरव्या रंगाला स्थान दिल्यामुळे तुमच्या पक्षाविषयी आपुलकी निर्माण झाली आहे. शिवाजी पार्कच्या मेळाव्याला दहा हजार मुस्लिम उपस्थित राहतील, अशी ग्वाही मुस्लिम नेत्यांकडून राज यांना देण्यात आली. विशेष म्हणजे याप्रसंगी मुस्लिम नेत्यांशी बोलताना राज यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या व्यंगचित्राला विरोध दर्शवला. पण त्याचवेळी त्यांनी हिंदू देवदेवतांची विटंबना होताना मुस्लिमांनीही विरोध करावा, अशी भूमिका घेतली.

मुस्लिम आणि शीख नेत्यांच्या भेटीसाठी हाजी अरफाज शेख आणि बंटी म्हशीलकर यांनी पुढाकार घेतला होता. तर शुक्रवारी शिरीष पारकर यांच्या प्रयत्नाने ईशान्य मुंबईतील दलित नेत्यांची राज यांच्याशी भेट घडवून आणली. शनिवारी उत्तर भारतीय नेत्यांसोबतच काही ख्रिश्चन नेतेही राज यांना भेटण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या कार्यपद्धतीत महत्त्वाचे स्थान असणाऱ्या माहितीफलकांना पर्याय म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यर्कत्यांनी स्वत:चे नवे माहितीफलक सुरू केले आहेत. अशाच दक्षिण मुंबईतील एका माहितीफलकाचे उद्घाटन अरविंद गावडे आणि परेश तेलंग यांनी केले.
 
posted by Rohit at 3:19 AM | Permalink | 1 comments
महाराष्ट्र निर्माण सेनेचेही ठाणे जिल्ह्यावर लक्ष
वाढलेली आमदार संख्या आणि वर्षभराच्या अवधीत होऊ घातलेल्या महापालिका निवडणूका यामुळे ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसला जसा आत्मियतेचा वाटू लागला आहे, तसाच तो राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही वाटतो आहे. म्हणूनच रविवार, 19 मार्चला शिवतिर्थावर होणाऱ्या मेळाव्यात लाखभर नवीन सैनिक ठाण्यातून नेण्याची तयारी करण्यात आली आहे.

ठाणे शहरातून राज ठाकरे यांच्याबरोबर जाण्याची पहिली संधी साधणारे कोपरीतील रवींद मोरे यांच्यासह भारतीय विद्याथीर् सेनेचे माजी अध्यक्ष अविनाश पवार, राजन गावंड, किरण ऐगडे या तरुण मंडळींनी राज ठाकरे यांच्या मागे तरुण कार्यर्कत्यांची नवीन फौज उभी करण्यासाठी कंबर कसली आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्या दौऱ्याची सुरुवात ठाण्यात आनंद दिघे यांच्या समाधीस वंदन करून केली होती. त्या दिवशी विश्रामगृहावर जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या कार्यर्कत्यांची संख्या मोठी होती.

नऊ तारखेला पक्ष स्थापनेची घोषणा झाल्यानंतरराज ठाकरे यांचे निकटवतीर्य शिरीष पारकर यांनी ठाणे व नाशिक जिल्ह्याचा दौरा केला. सामाजिक-राजकीय क्षेत्रातील कार्यप्रणालीबाबत सविस्तर माहिती देऊन कार्यकतेर् बांधण्यासाठी या दौऱ्यामुळे मदत झाली. पक्षाची अधिकृत घोषणा होण्यापूवीर्च नवी मुंबई आणि विक्रमगड येथे राज समर्थकांनी जनसंपर्क कार्यालये सुरू केली होती. 12 मार्च रोजी ठाण्यात वैतीवाडी भागात नवनिर्माण सेनेचे कार्यालय स्थापन झाले. विरार येथील जाहीर मेळाव्यात ख्ाश्चिन तसेच मुसलमानांची लक्षणीय उपस्थिती, कौपरखैरणेच्या मेळाव्या माथाडी कामगारांची उपस्थिती ही बदलत्या राजकीय परिणामांचे द्योतक असल्याचे मत राजकीय निरीक्षक व्यक्त करतात.

भारतीय विद्याथीर् सेनेतून राज ठाकरे यांच्यासोबत बाहेर पडलेल्या कार्यर्कत्यासोबत नवीन तरुणांनाही जोडण्याची मोहिम ठाणे शहरातील राज ठाकरे यांच्या पहिल्या प्रवासापासूनच सुरू झाली होती. ठाणे महापालिकेच्या निवडणूकीत मोठे यश नाही मिळाले तरी मोक्याच्या जागांवर माणसे उभी करून नुकसान करण्याएवढी शक्ती नवीन पक्षाने गोळा केली आहे. शहापूर हा तर नवीन पक्षाचा बालेकिल्ला म्हणूनच उदयाला येण्याची शक्यता असून भविष्यात तेथून शिवसेनेचा आमदार निवडून आणणे कठीण होणार आहे. मुरबाड, कल्याण, डोंबिवली, वाडा, भिवंडी, नवी मुंबई येथेही पक्षाच्या मेळाव्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. उल्हासनगरमध्ये संभाजी पाटील यांच्या प्रवेशामुळे तिकडच्या शिवसेनेला धक्का पोहोचला आहे.

राज ठाकरे यांच्या विश्रामगृहातील बैठकीपासून आतापर्यंतच्या काळात जो माहोल तयार झाला आहे ते पाहता सुमारे 70 ते 80 हजार नवीन सैनिक शिवतीर्थावरील मेळाव्यासाठी जातील.
 
posted by Rohit at 3:18 AM | Permalink | 0 comments
राज ठाकरेंच्या सभेचे घरोघरी आवताण...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रविवारी शिवाजी पार्क मैदानावर आयोजित केलेल्या पहिल्या सभेच्या निमित्ताने राज ठाकरे यांचे अनुयायी मोठे शक्तिप्रदर्शन घडवण्यासाठी गेला आठवडाभर अहोरात्र परिश्रम करत आहेत. मुंबईप्रमाणेच राज्यातील सर्व लहान मोठ्या शहरांत आणि जिल्ह्यांच्या ठिकाणी राज यांची पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज आणि कटआऊटस झळकताना दिसत आहेत. 'राज यांच्या सभेला आवर्जून यावे' अशी विनंती करणारी 'आवताणं' हजारोंच्या संख्येने घरोघरी वाटण्यात येत आहेत.

राज ठाकरे हे तरुणांची सर्वाधिक गदीर् खेचणारे आणि राज्यातील सर्वाधिक करिष्मा असणारे व्यक्तिमत्त्व आहे, हे रविवारच्या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दाखवून द्यायचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी याच मैदानावर जमलेलेल्या गदीर्चे रेकॉर्ड मोडले जाईल, अशा जिद्दीने या सभेची तयारी सुरू आहे. राज यांचे खंदे समर्थक प्रवीण दरेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी दादर भागात रविवारच्या सभेचे निमंत्रण करणाऱ्या हजारो आमंत्रणांचे घरोघरी वाटप केले. 'सह्यादी थरारून उठला, दऱ्या खोऱ्यातून प्रतिध्वनी उमटला, मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा, रपेट संपली, खलबते संपली, , आता निर्धार शिवतीर्थावर एकजूट दाखविण्याचा, मुहूर्त ठरला... रविवार फाल्गुन कृष्ण पक्ष चतुथीर् श्री शालिवाहन शके 1927, फिरंगी दिनांक 19 मार्च 2006' असे या आमंत्रणात म्हटले आहे. 'वाजत गाजत, गुलाल उधळत, नव महाराष्ट्राचा जल्लोष करत, तरुणाईच्या उमेदीने, पण हां, शिस्तीने या', असे आवाहनही आमंत्रणात आहे.

' अब राज हमारा है, होय, हे बंड आहे, राजकारणातील ढोंगाविरुद्ध - महाराष्ट्राच्या अस्मितेच्या अन्यायाविरुध्द- तरुणांच्या शोषणाविरुध्द, अशा घोषणा ठिकठिकाणी होडिर्ंग्जवर दिसत आहेत. राज यांची आक्रमक व करारी मुदा गदीर्त उभी आहे किंवा राज यांच्या डोळ्यावरील गॉगलमधे समोर पसरलेल्या गदीर्चे प्रतिबिंब दिसते आहे, अशी होडिर्ंग्ज मुंबईच्या सर्व प्रमुख रस्त्यांवर व नाक्या-नाक्यावर लावली आहेत.

मुलुंड परिसरात शिशिर शिंदे यांनी राज यांची अनेक भव्य कटआऊटस लावली आहेत. वेगवेगळ्या होडिर्ंग्जवर 'रंग लावू नवा, विचार रूजवू नवा, महाराष्ट्र घडवू नवा.. चलो शिवाजी पार्क' अशा घोषणा आहेत. वांदे ते दहिसर दरम्यानही खांबाखाबांवर शशिकांत जगदाळे व जयेंद कुमार यांच्या पुढाकाराने राज यांची पोस्टर्स झळकत आहेत.
 
posted by Rohit at 3:10 AM | Permalink | 0 comments
महाराष्ट्र नव निर्माण सेनेची स्थापना..

आपला फोटो वापरू नये ,' असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बजावले आहे. नव्या पक्षाच्या व्यासपीठावर राज यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे छायाचित्र असेल. शिवसेनेच्या स्थापनेच्या मेळाव्यास प्रबोधनकार उपस्थित होते , आता त्यांचे स्मरण करून राज नव्या पक्षाची स्थापना करीत आहेत.
पक्षाच्या ध्येयधोरणात टोकाचा मुस्लिम-विरोध नसेल , त्यांचा अनुनयही नसेल. ; दलितांबद्दल आपुलकीची भावना असेल. त्यामुळे पक्षाच्या झेंड्याला निळी अथवा हिरवी किनार असू शकते. महाराष्ट्राची अस्मिता हे राज यांच्या नव्या पक्षाचे सूत्र असेल. सर्व स्तरांतील जनतेचे कल्याण हा पक्षाचा हेतू असेल. धर्मजातिआधारित कोणताही भेदभाव पक्षात नसेल. कोणतीही खोटी आश्वासने द्यायची नाहीत , शिवसेना फोडण्यात रस दाखवायचा नाही , असे धोरण असेल. लोकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने बघणारा प्रामाणिक नेता , अशी प्रतिमा राज यांना निर्माण करायची आहे. नेत्याचे घर आणि पक्ष कार्यालय वेगळे राहील , याची दक्षता घेतली जाईल. आलेल्या प्रत्येकाला राज स्वत: भेटण्याचा प्रयत्न करतील.

राज यांच्यात लोक शिवसेनाप्रमुखांना बघतात याची जाणीव त्यांच्या समर्थकांना आहे. विशेषत: तरुणांची गर्दी राज यांना पाहायला जमते. ' नंबर वन क्राउडपुलर ' हे स्थान त्यांना कायम टिकवायचे आहे. नवा पक्ष म्हणजे विद्यार्थी सेनेचे नवे रूप नव्हे , याची जाणीव त्यांनी समर्थकांना करून दिली आहे. आपल्याबरोबर आलेल्या कार्यर्कत्याला पश्चात्तापाची पाळी येणार नाही. त्यांच्या आई-वडिलांना आपला मुलगा फुकट गेला , असे वाटणार नाही याची काळजी घेतली जाईल , असा शब्द राज यांनी दिला आहे. पक्षात कम्युनिस्टांप्रमाणे पॉलिट ब्युरो नसेल.

बाळा नांदगावकर , शिशिर शिंदे , दीपक पायगुडे , प्रवीण दरेकर , राजन शिरोडकर , अतुल सरपोतदार , केदार हुंबाळकर , संजय चित्रे , संजय घाडी , शिरीष पारकर अशा अनेक लढाऊ सहकाऱ्यांची टीम त्यांना लाभली आहे. 19 मार्चला शिवाजी पार्कवर नव्या पक्षाच्या पहिल्या मेळाव्यानिमित्त विराट शक्तिप्रदर्शनाची तयारी चालू आहे.
 
posted by Rohit at 3:07 AM | Permalink | 0 comments
राज ठाकरेंनी साधला '9'चा मुहूर्त

शिवसेनेचे बंडखोर नेते राज ठाकरे यांनी गुरुवारी ' महाराष्ट्र नवनिर्माण सेना ' या नव्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा करत ' 9 ' चा मुहूर्त साधलाच. ' जग बदललेय , त्याबरोबर महाराष्ट्रानेही बदलायला हवे ', अशी पक्षाची भूमिका मांडत , त्यांनी निळा , हिरवा , पांढरा आणि भगवा रंग असणारा सर्वसमावेशक असा ' पक्षध्वज ' जाहीर केला. विशेष म्हणजे राज यांनी शड्डू ठोकत , आपला पक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा केली.
सकाळीच घरी छोटी पूजा करून आणि सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन राज यांनी भरदुपारी सव्वाबारा वाजता पत्रकार परिषदेत नव्या पक्षाची घोषणा करताच प्रमुख कार्यकतेर् आणि पत्रकारांनी खचाखच भरलेल्या चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात टाळ्या आणि घोषणांचा गजर झाला. त्यानंतर लगेचच नाट्यमयरीत्या मागचा पडदा वर जाऊन ' महाराष्ट्र नवनिर्माण सेना ' ही अक्षरे चौरंगी झेंड्यासोबत अवतरली. ' इतके दिवस मी उत्सुकता ताणण्याची मजा घेत होतो असे नाही , उलट तुम्ही सगळे प्रसुतिगृहाबाहेर होतात , माझ्या कळा मला माहित ', अशा शब्दांत राज यांनी प्रास्ताविक मांडले.

आपण विकत घेतलेल्या कोहिनूर गिरणीच्या जमिनीवर निर्माण होणाऱ्या रोजगारात कोहिनूरच्या कामगारांच्या वारसांना सामावून घेण्यात येईल , असा खुलासा करतानाच अन्य गिरण्यांमध्येही हे घडावे , यासाठी आपला आग्रह असेल , असे त्यांनी सांगितले. ' गिरण्यांचा संप मी घडवून आणला नव्हता. झालेली घटना दुदैर्वी आहे... सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय आजपर्यंत आपण मानत आलोय... जमिनी विकायला मी लावले नाही. कामगारांना देशोधडीला मी लावले नाही. जे केले ते राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि एनटीसीने. याचे उत्तरदायित्त्व माझ्यावर कसे ? विकास हा होणारच आहे , असे घडणारच आहे , पण इथे राहणाऱ्या माणसाला स्वत:चे स्थान मिळायलाच हवे ,' अशी भूमिका त्यांनी गिरणजमीनविक्रीबद्दल सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशासंदर्भात मांडली. बाळासाहेबांच्या आपल्या-वरील वैयक्तिक टीकेला आपण कधीही उत्तर देणार नाही , असे राज यांनी टाळ्यांच्या कडकडात जाहीर केले. नारायण राणे यांना तुमच्या पक्षात घेणार का , असे विचारता ते उत्तरले ' मी कोणालाही आमंत्रण देणार नाही , पण कोणी आले तर त्याचे स्वागत करू , मान ठेऊ. '

टीव्हीच्या पत्रकारांनी वारंवार हिंदीतून प्रश्न विचारूनही राज जाणीवपूर्वक मराठीत उत्तरे देत होते. पक्षाची ध्येयधोरणे , झेंड्याच्या रंगांचे अर्थ , महाराष्ट्र , मराठी माणूस , परप्रांतीय , हिंदुत्व या विषयांवरची भूमिका 19 तारखेला शिवाजी पार्कच्या सभेत आपण मांडू , तसेच पक्षसंघटनेची रचना , पक्षाच्या आघाड्या , पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका , अन्य पक्षांशी युती यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
 
posted by Rohit at 3:01 AM | Permalink | 0 comments
Begining of New Revolution...


मित्रहो,
राज ठाकरे - एक धगधगते, बंडखोर व्यक्तिमत्व. पण त्याच्या बंडखोरीला एक वेगळाच सुगन्ध आहे. त्यामधे इतरान्सारखा स्वार्थ इन्चभरही दिसत नाही. अन्याय आणि फ़क्त अन्यायामुळेच शिवसेनेतून बाहेर पडलेल्या या मराठी युवकास मराठी माणसासाठी खरेच काहीतरी मनापासून करण्याची धडपड, उर्मी आहे.

समर्थकान्च्या "आगे बढो, हम तुम्हारे साथ है", या सादेला राजने ओ दिलेली आहे आणि त्याच्या धर्मनिरपेक्ष पक्षाची विजयी घौडदौड सुरूही झालेली आहे.

राजच्या स्वप्नातला महाराष्ट्र सर्वसामान्यान्च्या स्वप्नातल्या महाराष्ट्रापेक्षा वेगळा नक्कीच नसणार, याची आम्हाला खात्री आहे. आणि म्हणूनच मित्रान्नो, महाराष्ट्राच्या नवनिर्माण प्रक्रियेचे उगमस्थान, आशास्थान, श्रध्दास्थान, स्फुर्तीस्थान असलेल्या या अस्सल मराठी युवा नेत्याला आपण खारीच्या वाट्याने का होईना - मदत करू शकतो, नाहीच जमले तर पाठीबा तरी नक्कीच देऊ शकतो.

मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा.
-

ता.क. : शिवाजी पार्कवर १९ मार्च रोजी पार पडलेल्या MNS च्या पहिल्या वहिल्या जाहीर मेळाव्याला जमलेली विक्रमी गर्दी पाहून असे नक्कीच वाटते की, 'Well begun is half done.'
-
जय महाराष्ट्र
 
posted by Rohit at 1:27 AM | Permalink | 0 comments